Thursday, 1 September 2016

लक्षात राहिलेला प्रवास (Journey)


 पुणे – मुंबई प्रवास हा माझा तसा सर्वात आवडता प्रवास...  फक्त  हाय वे वर कोठे ट्रॅफिक नाही लागली की मग जरा बरं वाटतं.   काहीजण तर रोजच मुंबई- पुणे असा प्रवास करतात, त्यांना कंटाळा कसा येत नाही काय माहित?  मी एकदा माझ्या कॉलेज फ्रेंड्स सोबत पुण्याला गेले होते. कल्याण ते पुणे असा खाजगी बसने आम्ही प्रवास केला. प्रवासात गाण्यांच्या अंताक्षरी, काही जनरल  नॉलेज च्या गोष्टी शेयर होत होत्या. प्रवासात खूप मज्जा आलेली.  पुण्याला पोह्चल्यांनंतर आम्ही व्हिट्स हॉटेल मध्ये गेलो. तिथे सर्व सामान ठेवलं आणि मग नंतर फ्रेश होऊन आम्ही सर्वजण गोवर्धन फॅक्टरी ला भेट देण्यासाठी गेलो. प्रत्येक वेळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेली प्रोसेस प्रत्यक्षात पाहतांना कुतूहल वाटत होते. तिथे आम्ही गोवर्धन च्या अनेक पदार्थांची खरेदी केली. तिथून आम्ही एका ठिकाणी गेलो जिथे सोलकढी खूप प्रसिद्ध होती. ते झाल्यांनतर आम्ही सारस बाग, पर्वती या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणांना पाहून आम्ही भारावून गेलो. ऐन पावसाळ्यात गेल्यामुळे तेथील देखावा पाहण्यासारखा होता. 

त्यांनतर आम्ही टिळक वाड्याला गेलो. टिळकांची स्मारक, पुस्तके, गणेशोत्वाची पालखी, सर्व फोटोज आम्ही न्याहाळून पाहत होतो. तिथे जाऊन आम्हाला खूप काही पाहता आले. त्यामुळे आमच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडली.. विद्येचे माहेरघर असणारे पुणे तिथे काय उणे हे म्हणणे तसे खरेच आहे. याची जाणीव पुण्याला गेल्यावर नक्की होते. 

- किशोरी यशवंत घायवट

No comments:

Post a Comment

शिक्षक होण खरच सोप्प नसत!

शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे ? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी … ' छडी लागे छम छम ' चा जमाना संपला आ...