कॉलेज लाईफ या शब्दांचा अर्थ किंवा महत्व कदाचित
कॉलेज संपल्यावर जास्त समजतो कारण एखादी गोष्ट जेंव्हा आपल्याजवळ नसते
तेव्हांच तिचे महत्व आपल्याला जास्त कळते आणि हे आनंदी दिवस तर आपल्या
जीवनात अगदीच अलगद, नकळत येतात की जेव्हा आपण वयाच्या रुपांतरणाच्या
अवस्थेत जास्त असतो. रुपांतरणाची अवस्था म्हणण्याचे कारण की, 11/12 वी ही
जी महाविद्यालयीत वर्षे असतात, ती साधारणत: प्रत्येकाची कॉलेज या शव्दाचा
अर्थ समजण्याच्या आधीच संपून जातात. आपल्या कॉलेजची एक चांगली प्रथा आहे प्रत्येक
बॅच स्वत:साठी एक नाव ठरवते आणि ती बॅच त्याच नावाने ओळखली जाते.
आजही FRIENDS FOREVER... हा शव्द नुसता आठवलातरी संपूर्ण बॅच डोळयासमोर
उभा राहते आणि संपूर्ण कॉलेज जीवन एका झटक्यात समोरुन निघून जाते. असे
वाटते की, या नावात काही तरी जादू आहे. कॉलेजच्या काळात जेव्हा एखादा
निर्णय घेण्याची वेळ यायची त्यावेळी मनात एक आत्मविश्वास असायचा कारण तो
निर्णय यशस्वी करण्यासाठी संपुर्ण बॅच आपल्या मागे आहे याची खात्री असायची.
हा आत्मविश्वास किंवा अशी खात्री असण्याला कारण ती म्हणजे बॅचमध्ये असणारी युनिटी. मतभेद, गृपस् प्रत्येक बॅच मध्ये असतातच आम्हीही काही त्याला वेगळे
नव्हतोच पण जेव्हा सगळयांनी मिळून घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असो किंवा
नसो तोच आपला निर्णय आहे असे समजून बॅचला पाठींबा देणारी भावना
आमच्यामध्ये होती. उदाहरणच द्यायचे झालेतर अक्षरश: आमच्या बॅचच्या नाव
ठेवण्यावरुन ही बरेच मतभेद झाले परंतू जेव्हा नाव ठरले तेव्हा ते नाव
प्रत्येकाने असे जगले की जसे काही ते नाव मीच सुचवले होते. मला वाटते की
आमच्या सर्वांच्या सफल कॉलेज जीवनाचा खरा मुलमंत्र कदाचीत ही भावनाच होती.
या भावनेनेच आमच्या बॅचला किंवा आमच्या कॉलेज जीवनाला एका विषेश
आयामापर्यंत पोहचलेलो पाहतो.
खरच बीएमएम ची 'ती' ३ वर्षे कशी गेली ते कळलंच नाही, पण त्या तीन वर्षात केलेली मज्जा आयुष्यभर आठवण्यासारखी आहे. बिर्ला कॉलेज, तेथील निसर्गरम्य वातावरण, अनेक कार्यक्रम, वृक्षदिंडी, आर्ट सर्कल, बिर्लोस्तव, बिर्लाईट मॅगझीन, द्रिश्य, प्रवाह यांसारखे इव्हेंट्स नेहमी स्मरणात राहतील.... बिर्ला कॉलेज चे सर्व शिक्षकवृंद, इतर कर्मचारी खूप चांगले होते. अडचणीच्या वेळी मदतीसाठी तत्पर असणारे तेच होते, आणि काहीवेळा चूक झाली की माफ करून समजावून सांगणे ही तेच होते....
पुन्हा त्या पहिल्या बाकावर बसून लेक्चर्स ऐकावे, नोट्स काढाव्यात, अभ्यासासोबत मौज-मज्जा करावी असे आता वाटते... खरचं ते दिवस पुन्हा जगावे आणि काही क्षणांसाठी का होईना पण त्यातच विसावून राहावे...
-किशोरी यशवंत घायवट
No comments:
Post a Comment