'आरोग्यम धन संपदा' असे म्हणणारा माणूस,
Wealth च्या नादात Health ला विसरला,
Exercise, Dieting करत असून देखील
Fast-food च्या विश्वात हरवला.
झाडे लावा, झाडे जगवा असे नुसतेच म्हणून,
जंगलतोड करून, आकाशाला चुंबणाऱ्या बिल्डींगचे स्वप्न पाहू लागला.
'विजेची बचत काळाची गरज' असा धडापाठ करून सुद्धा,
इलेक्ट्रॉनिक साधने विनाकारण ऑन ठेऊन Social Networking मध्ये Busy राहू लागला.
'नजर हटी दुर्घटना घटी' हे ब्रीदवाक्य माहित असून पण,
इतर वाहनांना Overtake करून पुढे जायला शिकला.
आणि कराटेच्या बेल्ट साठी मेहनत करणारा सीट बेल्ट ला मात्र विसरला.
Mineral Water पिणारा 'वडा पाव' सोबत पेप्सी-कोला पिला, आणि
पाणीपुरी खातांना मात्र पुरेपूर फसला.
हरितक्रांतीसाठी ठिंबक सिंचन करणारा Shower खाली न्हाऊ लागला,
No Smoking च्या Board खाली स्मोकिंग करू लागलाय.
सुरक्षेचे Rules मनात ठेऊन माणूस मनमानी करू लागला आणि
सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असूनही, यंत्र निर्माण करणारा मनुष्य अकाली आपले जीवन गमावू लागला.
क्षितिजाला पोखरून प्रकाश शोधणारा माणूस निसर्गाला थोपवून त्सुनामींना Miscall करू लागला आणि म्हणूनच,
वाळवंटाचा भस्मासुर तुफानात खुदूखुदू हसू लागला, खुदूखुदू हसू लागला !
- किशोरी यशवंत घायवट
#जागतिकपर्यावरणदिन
#५जून
No comments:
Post a Comment